धवल क्रांती पुरस्काराने लातूर जिल्ह्यातील १२ आदर्श दुध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान, डॉ. अनिल भिकाने यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष गौरव सोहळा

0
धवल क्रांती पुरस्काराने लातूर जिल्ह्यातील १२ आदर्श दुध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान, डॉ. अनिल भिकाने यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष गौरव सोहळा

उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील मौजे करडखेल येथे
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे माजी विस्तार शिक्षण संचालक तथा पशुपालक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक डॉ. अनिल भिकाने यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्ह्यातील १२ आदर्श दुध उत्पादक शेतकऱ्यांचा “धवल क्रांती पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. हा महत्वाकांक्षी व प्रेरणादायी सोहळा करडखेल येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीर तालुक्याचे माजी आमदार व ज्येष्ठ शेतकरी नेते शिवराज तोंडचिरकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लातूर कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, लातूर जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापक रामराव बिरादार, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे गुरुजी व करडखेलचे उपसरपंच गिरीश राघू यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पशुपालक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून संपूर्ण आयुष्य शेतकरी व पशुपालकांसाठी निस्पृह भावनेने समर्पित करणारे, संशोधन, शिक्षण व विस्तार कार्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. अनिल भिकाने यांचा यावेळी मान्यवरांनी गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकरी आधुनिक पशुपालन व दुग्ध व्यवसायाकडे वळले असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळाले आहे, असे मत मान्यवरानी व्यक्त केले.
कार्यक्रमात दुध उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे लातूर जिल्ह्यातील सतपाल रेड्डी (उजेड), विष्णू कोळगीर (चोंडी), नविद अलिखान (अहमदपूर ) राजपाल बिराजदार (नेकनाळ), संतोष पाटील (तोंडार), राहुल रक्षाळे (लोहारा) ,प्रविण घुगे (कुमठा ) गणेश मातनकर (करडखेल) , वैभव वाडकर ( डिगोळ), परमेश्वर नरहारे ( तिवटग्याळ), गणेश गुरमे (हेर ), राम गंगापुरे (कबनसांगवी) आदी १२ आदर्श दुध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी दूध उत्पादक सहकारी संस्था, करडखेल यांच्या वतीने करण्यात आले होते. ज्ञानेश्वर कंजे यांनी या उपक्रमाचे प्रमुख संयोजक म्हणून पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ मुडपे, सुत्रसंचालन कुणाल घुंगार्डे , प्रक्षेत्र व्यवस्थापक एम एसडी ॲनिमल हेल्थ यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर कंजे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओकांर मेडिकलचे महादेव सुर्यवंशी यानी परिश्रम घेतले.
यावेळी जिव्हाळा ग्रुपचे विश्वनाथराव बिरादार, अमृतराव देशपांडे, माजी सरपंच दिलीप निडवंचे, कृष्णाथ जाधव, राहूल उगीले, ज्ञानोबा गुरमे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, दुग्ध उत्पादक, पशुपालक, सहकारी संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!