मातृवंदनेचा महाराष्ट्रात ऐतिहासिक ठसा – ‘आई’ विषयावर 1121 कवितांचा भव्य काव्यग्रंथ प्रकाशन सोहळा 14 डिसेंबरला

0
मातृवंदनेचा महाराष्ट्रात ऐतिहासिक ठसा – ‘आई’ विषयावर 1121 कवितांचा भव्य काव्यग्रंथ प्रकाशन सोहळा 14 डिसेंबरला
  साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन ( सीता ट्रस्ट) यांच्या तर्फे, तसेच संस्थेचे अध्यक्ष मातृ भक्त आचार्य सी ए. प्रा. शंकर अंदानी संकल्पना व यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच आई विषयावर आधारित 1121 कवितांचा अभूतपूर्व काव्यग्रंथ प्रकाशीत होत आहे. एका एकमेव विषयावर इतक्या मोठ्या प्रमाणात साकारलेला हा काव्यसंग्रह राज्यात पहिल्यांदाच वाचकांसमोर येत असल्याने साहित्यविश्वात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
 या काव्यग्रंथाचे संकल्पनाकार, कवी व संपादक मातृभक्त आचार्य श्री. प्रा. (सी.ए.) डॉ. शंकर अंदानी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील 500 हून अधिक कवींकडून एकत्रित केलेल्या 1121 कवितांचे संकलन करून हा अनोखा साहित्यिक महोत्सव साकारला आहे. मातृत्वाच्या भावनेला वंदन करणारे हे भव्य काव्यदालन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत सोन्याचा अक्षराक्षर ठसा उमटविणारे ठरणार आहे.
प्रकाशन सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी 2 धर्मगुरू

महामंडलेश्वर श्रीकृष्णगिरीजीमहाराज, तसेच 1008 महामण्डलेश्वर श्री दत्तात्रय दहिवळ महाराज तसेच पद्मश्री श्री दादा साहेब इदाते ,पद्मश्री माजी खासदार श्री विकास महात्मे, पद्मश्री श्री उदय देशपांडे, पद्मश्री सौ राही बाई पोपरे ताई, पद्मश्री श्री पोपट राव पवार साहेब, राज्यसभा खासदार सौ मेघा ताई कुलकर्णी, अहमद नगर चे लोकसभा खासदार श्री नीलेश लंके साहेब, अहिल्या नगर चे आमदार श्री संग्राम जगताप साहेब, तसेच , तसेच राज्यभरातील नामांकित साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक आणि तब्बल 250 कवी उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात राज्यस्तरीय कवी महोत्सव, तसेच 21 आदर्श माता सन्मान आणि 11 मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
मातृत्व, साहित्य आणि संस्कृतीचा संगम घडवणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे.
हा ऐतिहासिक कार्यक्रम रविवार, दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला असून साहित्यप्रेमी, कवी, अभ्यासक आणि जनसामान्यांसाठी हा सोहळा एक पर्वणी ठरणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!