खेळामुळे व्यक्तीच्या शरीरासह मानसिक बळ मिळते – बोरगावकर.

0
खेळामुळे व्यक्तीच्या शरीरासह मानसिक बळ मिळते - बोरगावकर.

उदगीर (एल पी उगिले)
मैदानी खेळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांचे शरीर तर मजबूत होतेच, शिवाय मानसिक दृष्टया सुद्धा सकारात्मक परिणाम होतात. असे मत उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी पत्रकारांच्या वतीने मातृभूमी महाविद्यालयामध्ये अजिंक्य खेळाडुंचा सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी मातृभूमीच्या प्राचार्या श्रीमती उषा कुलकर्णी , केंद्रप्रमुख मारोती लांडगे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद पद पटकावलेला गजेंद्र पांचाळ , राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पधेत प्रथम आलेल्या कु. नुपुर रामदास मलवाडे व महिल शिक्षका अर्चना शेवाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
पुढे बोलताना बोरगावकर म्हणाले की, अनेक छोटे छोटे देश सुद्धा मैदानी खेळात मोठ्या प्रमाणात प्रगती केलेले आपण पाहतो .पण आपला देश त्या दृष्टीने खुप मागे असून त्यात महाराष्ट्र व महाराष्ट्रात आपला मराठवाडा तर खुपच मागे आहे. त्यामुळे मैदानी खेळाला महत्व देणे गरजेच असून ती काळाजी गरज असल्याचे सांगतले. अलिकडे मैदानी खेळ खुपच कमी झाले असून अनेक ठिकाणी मैदानचं शिल्लक राहिले नसल्याची खंत यावेळी व्यक्त करताना अनेक पालकांना असे वाटते की , मूलं खेळण्यात वेळ घालवला तर शिक्षणात कमी पडतात.पण एखादा खेळाडू जर कोणत्याही खेळामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर विशेष कामगीरी केली तर , त्यांना वर्ग एकच्या पदासह अनेक विभागात स्पर्धा परिक्षा शिवाय सरळ नियुक्ती देण्याची पद्धत शासन दरबारी तरतुद असल्याचे म्हणाले, व खेळाडूंचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार विनायक चाकुरे , बबन कांबळे, सुनिल हवा, सुनिल मादळे ,प्रभुदास गायकवाड , सिद्धार्थ सुर्यवंशी , शेख इरफान, हाणमत केंद्रे, महादेव गोणे, मंगेश सुर्यवंशी,निवृत्ती जवळे,संदिप निडवदे, आदि पत्रकारांसह श्रीमती अरुणा पांचाळ, साहित्यिक रामदास केदार,अमजद पठाण, रामदास मलवाडे, शेवाळे इत्यादी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन शिवशेट्टे यांनी तर आभार प्रा. बिभीषण मद्येवाड यानी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!