जिव्हाळा ग्रुपच्या वतिने राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त कृषि रत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

0
जिव्हाळा ग्रुपच्या वतिने राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त कृषि रत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

उदगीर (एल पी उगिले) शेती व शेतकरी हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून जिव्हाळा ग्रुपच्या वतिने शेतीनिष्ठ शेतकरी अमृतराव देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली जिव्हाळा कृषी रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. व्यासपीठावर लातुरच्या कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ बाबासाहेब ठोंबरे, माफसूचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ अनिल भिकाने व जिव्हाळा ग्रुपचे सचिव डॉ अशोक दारनुळे उपस्थित होते.
सदरील सोहळ्याची सुरवात काळया मातीत “मातीत.. तिफण चालते ….. ” या सुंदर शेतकरी गीताने विठ्ठलराव फुलसे यांनी केली. प्रास्ताविकात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे यानी शेतकरी दिनाचे महत्व विषद केले .सदरील कार्यक्रमात सेद्रींय शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे कृषिभूषण ओमकार मसकल्ले ( महादेववाडी, देवणी), प्रगतीशील शेतकरी नंदकिशोर पाटील ( सताळा ता उदगीर ) व देवणी गोवंशाचे संवर्धन करणारे पशुपालक पटेल रज्जाक अली उस्मान अली (रा नेत्रगाव, ता उदगीर) यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पहार व स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. विकसित भारत -२०४७ अंतर्गत भारतीय शेतीचे जागतिकीकरण करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनाची भूमिका ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. शाश्वत शेतीसाठी गट शेती, सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींवर भर देवून पिक उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे असल्याचे डॉ.अनिल भिकाने यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. तर
शेतकऱ्यानी शेतीतील उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, बदलत्या हवामानानुसार पिक घ्यावे व शेतीला जल सिंचनाचे योग्य नियोजन करून पाणी द्यावे असे आवाहन डॉ बाबासाहेब ठोबंरे यांनी केले.
ओमकार मसकल्ले यांनी जिव्हाळा ग्रुपचे मनःपूर्वक आभार मानले. हा सन्मान भविष्यात अधिक जबाबदारीने, निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप अमृतराव देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रगतिशील शेतकरी लक्ष्मीकांत बिडवई तर उपस्थिताचे आभार दिलीप कंधारे यांनी मानले.
कार्यक्रमास कृषि महाविद्यालयाचे डॉ अनंत शिंदे,डॉ अनिल कांबळे, डॉ पवनसिंह ठोंबरे, मजविपचे गोपाळराव कांबळे,जिव्हाळा ग्रुपचे देविदासराव नादरगे, रमाकांत बनशेळकीकर, सच्चीदानंद पुठ्ठेवाड, चंद्रकांत रोडगे , सुभाष तगाळे, पांडूरंग बोडके, शंकरराव साबणे, प्रा दिपक पाटील, शरणप्पा खेळगे, मनोहर खिंडीवाले, रामराव मोमले, वैजनाथराव पंचगल्ले, बाबुराव वाघमारे, चंद्रकांत उप्परबावडे, चंद्रकांत पांचाळ आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!