शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – निवृत्तीराव सांगवे

0
शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा - निवृत्तीराव सांगवे

उदगीर (एल पी उगिले) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या निमित्ताने महापराक्रमी 500 शूर वीरांना आणि त्यांच्या महान पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी मराठवाडा विभागातून लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तसेच दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक निवृत्तीराव सांगवे, भीमराज सेना प्रमुख राजूभाऊ थाटे, भीमराज सेनेच्या महाराष्ट्र प्रमुख जयाताई बनसोडे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केले आहे.
या अनुषंगाने आवाहन करताना निवृत्तीराव सांगवे यांनी स्पष्ट केले की, एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे पेशव्यांच्या जवळपास 28 हजार सैनिकांच्या विरुद्ध केवळ 834 सैनिक लढले आणि जिंकले. ही लढाई पेशव्यांच्या सत्तेच्या अंतासाठी निर्णायक ठरली. महार समाजाच्या सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळे बहुजन समाजासाठी आत्मसन्मानाचे हे प्रतीक ठरले. पेशव्यांच्या उच्च जातीय वर्चस्वाविरुद्ध सामाजिक न्यायासाठी हा लढा दिला आणि विजय संपादन केला. या लढ्यात 500 शूरवीरांचे बलिदान झाले. त्यांच्या पराक्रमाची गाथा पुढील पिढीला आठवणीत राहावी, यासाठी प्रत्येकाने स्वाभिमानाने या शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथील आपल्या अस्मितेच्या विजय स्तंभाला नतमस्तक होऊन त्या विजय स्तंभावर नोंदवलेल्या 500 महापराक्रमी शूरवीरांनाही अभिवादन करावे. विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी या स्मारकाला भेट देऊन या दिवसाला दलित समाजासाठी सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र बनवले आहे. ज्यामुळे हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळत असतो. याची जाणीव मराठवाड्यातील जनतेनेही ठेवावी आणि मोठ्या संख्येने शौर्य दिनाच्या या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहून शूरवीरांना मानवंदना द्यावी असेही आवाहन निवृत्ती राव सांगवे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!