आवड व क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवावे- डॉ गौरव जेवळीकर

0
आवड व क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवावे- डॉ गौरव जेवळीकर

उदगीर (एल पी उगिले) प्रत्येकात कांहीतरी क्षमता असतातच त्या क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवावे, व ते ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. असे प्रतिपादन प्रा. डॉ. गौरव जवळेकर यांनी केले. ते मातृभूमी महाविद्याल महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उषा कुलकर्णी या होत्या. पुढे बोलताना डॉ जेवळीकर म्हणाले की, “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी” आणि “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका,” हे दोन महान विचार ज्यांच्या आयुष्याचे सार आहेत, अशा दोन थोर व्यक्तींना आज आपण वंदन करण्यासाठी येथे जमलो आहोत.
सर्वात आधी आपण वंदन करूया जिजाऊ माँसाहेबांना. जिजाऊ केवळ शिवबांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या खऱ्या शिल्पकार होत्या. ज्या काळात चहूकडे अंधार होता, परकीयांचे अत्याचार होते, त्या काळात त्यांनी शिवबांना केवळ युद्धाचेच नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे आणि नीतिशास्त्राचे संस्कार दिले. त्यांनी मनात स्वराज्य उभारण्याचे स्वप्न पेरले, म्हणूनच आपल्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ मिळाले.
दुसरीकडे, स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्माची पताका संपूर्ण विश्वात फडकवली. १८९३ च्या शिकागो धर्मपरिषदेत त्यांनी “माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो” अशी सुरुवात करून भारताच्या विशाल हृदयाची ओळख जगाला करून दिली. स्वामीजींचे विचार आजही तरुणांसाठी ऊर्जेचा स्रोत आहेत. ते म्हणायचे, “स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.”
मित्रांनो, जिजाऊंनी आपल्याला ‘कर्तृत्व’ शिकवले, तर स्वामीजींनी आपल्याला ‘आत्मविश्वास’ दिला.आजच्या युवकांसाठी या दोन्ही महापुरुषांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे. असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बिभिषण मद्देवाड यांनी तर आभार प्रा रणजीत मोरे यांनी मानले केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रा. उस्ताद सय्यद, प्रा. शिवांगी वट्टमवार, प्रा. अन्वेश हिपळगावकर, प्रा. जाई शर्मा, प्रा. दीक्षा स्वामी, प्रा. काकरे प्रतीक्षा, प्रा. मीरा पाटील, प्रा. राहुल जाधव, प्रा. नेहा वाघमारे, ग्रंथपाल उषा सताळकर, जगदिशा ओंकारे, काळे अस्विनी, मादळे प्रदीप, दयानंद टाके, विवेक देवर्षे, मयुर मुळे, प्रकाश गायकवाड, मुबारक पटेल, अर्चना बिरादार व देवानंद डोंगरे यांच्यासह शिक्षक शिक्षेत्तर कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!