खाजगी संस्थेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन खाजगी संस्थेतच करा

खाजगी संस्थेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन खाजगी संस्थेतच करा

खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन

लातूर (प्रतिनिधी) : बोगस विद्यार्थी प्रवेश व इतर कारणाने लातूर जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांची पदे अतिरिक्त झाली आहेत. या शिक्षकांचे समायोजन खाजगी संस्थेतच करावे या मागणीसाठी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने लातूर जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ठेवण्यात येणाऱ्या 100 बिंदुनामावलीमध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप करून खुल्या प्रवर्गाचा हक्काच्या जागा मागासवर्गाकडे वळवल्या जातात हे शासनाने नेमलेल्या चौकशी समिती अहवालातून सिद्ध झालेले आहे. या अहवालाची अंमलबजावणी करून बींदूनामावली अद्यावत करण्याचे शासनाचे आदेश होते. मात्र या चौकशी अहवालानुसार बिंदुनामावली अद्यावत करण्यात आली नाही . भ.ज.क. प्रवर्गातून लातूर जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांची नोंद त्यांच्या मागासवर्गात न करता खुल्या प्रवर्गात करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषद मधून लातूर जिल्हा परिषदेकडे नियुक्तीचा प्रवर्ग चुकीचा नोंदवून आंतरजिल्हा बदली मिळवलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रद्द करा अशी मागणी महासंघाने आपल्या निवेदनात केली आहे.

सन 2010 साली सह. आयूक्त मागासवर्ग कक्ष, औरंगाबाद कार्यालयाने लातूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली मंजूर करून दिली होती. या बिंदुनामावलीमध्ये मागासप्रवर्गातून नोंदवलेल्या 130 शिक्षकांकडून लातूर जिल्हा परिषदेने बेकायदेशीरपणे खुलासा पत्रे घेऊन त्यांची नोंद आगामी सर्व बिंदूनामावलीमध्ये खुल्या प्रवर्गात केली आहे. या 130 शिक्षकांची नोंद शासन मान्य 2010 च्या बिंदुनामावलीनुसार त्यांच्या मागासवर्गात करायला हवी होती मात्र जिल्हा परिषदेने तसे केले नाही.

शासनाच्या बदली धोरणानुसार एका शिक्षकाला त्याच्या सेवाकाळामध्ये केवळ एक वेळाच आंतरजिल्हा बदली करण्यात ती संधी दिली जात होती. केवळ अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना दुसऱ्यांदा आंतरजिल्हा बदलीचे लाभ दिला जात होता. सन 2015 यावर्षी दोन शिक्षकांना अपवादात्मक परिस्थिती नसताना दुसऱ्यांदा आंतरजिल्हा बदलीचा लाभ देण्यात आला . या प्रकरणावर आक्षेप घेतल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाच सदस्यांची चौकशी समिती नेमली. या चौकशी समिती सदस्यांनी सदर बदली कायदेशीर आहे असा अहवाल तयार केला. या सदस्यांची चौकशी व्हावी, लातूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची रिक्त पदे तातडीने पदोन्नतीने भरण्यात यावीत , खोटी माहिती भरून आंतरजिल्हा बदली मिळवलेल्या शिक्षकावर कारवाई व्हावी अशा मागण्या आंदोलन करत असलेल्या खुल्या प्रवर्गात रुजू झालेल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!