जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल च्या उमेदवारांना निर्णायक मताधिक्य द्यावे

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल च्या उमेदवारांना निर्णायक मताधिक्य द्यावे

आमदार धीरज देशमुख यांचे आवाहन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या भागातील शेतकरी सभासद याना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे बँकेने अनेक धाडसी निर्णय घेवून शेतकरी सभासदांना न्याय देत आर्थिक सुबत्ता मिळाली राज्यात पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पिक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय याच बँकेने घेतला ही विकासाची साखळी पुढें चालु ठेवण्यासाठी या निवडणुकीत काही जूने नवे संचालक मंडळ याना संधी दिली आहे सर्वांना सोबत घेवुन यापुढेही चांगल काम करण्याचा प्रयत्न सहकार पॅनल च्या माध्यमातून होणार आहे यासाठी तालुक्यातील मतदारांनी एकत्रीत येवून मतदान करून निर्णायक मताधिक्य द्यावे असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे ते मंगळवारी लातूर तालुक्यातील हरंगुळ खू येथे आयोजीत सहकार पॅनल च्या प्रचारार्थ प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२१ च्या सहकार पॅनल चे अधिकृत उमेदवार सौ स्वयं प्रभा पाटील, सौ अनिता केंद्रे, सौ सपना किसवे, अनुप शेळके, धनराज पाटील, बँकेचे संचालक राजकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील लोकांना अडीअडचणीला धावून जाणारी बँक

यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले की गेली तीन दशके या भागातील लोकांचे आपले नाते राहीलेले आहेत विकासाच्या अनेक योजना राबविल्या आहेत साखर कारखाना व बँकेच्या माध्यमातुन या दोन्ही संस्थेतून या भागांतील शेतकरी सभासद याना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे त्यामूळे ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायटी या सक्षम झाल्या इथला शेतकरी स्वावलंबी झाला यामागे जिल्हा बँक, साखर कारखाना यांचे योगदान राहीलेले आहे असे सांगून मला विधानसभा निवडणुकीच्या काळात मला ज्या पद्धतीनं आशिर्वाद दिला त्यांचं पद्धतीनें होणाऱ्या निवडणुकीसाठी सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारास अधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

बँकेच्या माध्यमातून नवीन योजना राबवणार

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वेगवेगळ्या योजना बँक राबवत आहे अनेक धाडसी पाऊल पुढे टाकत असताना अजून नवीन काही करता येईल का यासाठी कुक्कुट पालन, दूग्ध व्यवसाय, तरुणांना रोजगार मिळेल अशा काही योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न बँकेच्या माध्यमातून आगामी काळात करणार असल्याचे आमदार धीरज देशमुख त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, गोविंद बोराडे, मांजरा साखर कारखान्याचे संचालक कैलास पाटील तालुक्यातील विविध गावातील मतदार उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!