लातूर जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात वेगळा पॅटर्न निर्माण केला

लातूर जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात वेगळा पॅटर्न निर्माण केला

सहकार पॅनल उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार धीरज देशमुख यांच्या लातूर तालुक्यात बैठकीला मोठा प्रतिसाद

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याचा शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख यांनी सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याचा ३० वर्षात कायापालट करत आमुलाग्र बदल केला. एवढ्यावरच आपल्याला थांबायचे नाही. या विकासाला समाजाच्या मागणीनुसार आणखी गती देण्याचे काम करायचे आहे. आपली स्पर्धा राज्य व देशातील बँकांशी असुन लातूर जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. त्यामुळे चांगल्यांना अधिक चांगले करण्याची जबाबदारी आपली आहे. शेतकरी, मजूर, महिला, सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थी यांसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून कर्ज सुविधा देण्याचे काम जिल्हा बँकेने केले आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक तथा आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी येथे बोलताना दिली ते लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकी च्या सहकार पॅनल उमेदवारांच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील जोड जवळा येथे आयोजित मतदार संवाद बैठकीत बोलत होते.

यावेळी बोलताना धीरज देशमुख म्हणाले की येणाऱ्या काळातही बँकेच्या माध्यमातून गरजू शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांसाठी रेशीम शेती, यांत्रिक, सुधारित शेती, प्रक्रिया उद्योग, पशुपालन यातून आर्थिक सक्षम करुन या भागाचा विकास करायचा आहे. तसेच महिला व मुलींनाही मुख्य प्रवाहात आणण्यांसाठी चांगल्या योजना राबविल्या जाणार आहेत. यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देता येईल.

जिल्हा बँकेला पुनर्वसनातून बाहेर काढून यशाच्या शिखरावर नेण्याचे कार्य दिलीपराव देशमुख यांनी केले

यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे म्हणाले की,
थकबाकीने डबघाईला आलेल्या जिल्हा बँकेला दिलीपराव देशमुख यांनी बाहेर काढून यशाच्या शिखरावर नेले आहे. यामागे त्यांचे कठोर परिश्रम व काटेकोर व्यवस्थापन आहे. दिलीपराव देशमुख साहेबांकडे जिल्हा बँकेची सूत्रे आल्यानंतर बँकेची थकीत बाकी वसूल करण्यासाठी स्वत:च्या हस्ताक्षरात थकबाकीदारांना पत्र लिहिले. जिल्ह्यात वसुली मेळावे लावले. काहींना बोलवून त्यांना थकबाकी भरण्याची विनंती केली. त्यामुळेच जिल्हा बँक आपली सर्वसामान्यांची बँक म्हणून काम करते आहे. जिल्हा बँक संचालकांच्या रुबाबासाठी नसते तर ती सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असते, या नियमानुसार बँकेचा पारदर्शक कारभार दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला म्हणूनच बँकेने राज्यात नावलौकिक मिळविला आहे. शेतक-यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी आधार देणा-या जिल्हा बँकेची दिमाखात वाटचाल सुरु आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून लातूरला सुजलाम सुफलाम करणा-या दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील सहकार पॅनलच्या पाठीमागे उभे रहावे, असे आवाहन श्री शिंदे यांनी केले.

यावेळी अरुण कापरे, किशन लोमटे शास्त्री मालक, कैलास पाटील, सौ दैवशा ला राजमाने, बबनराव ढगे, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर भिसे, पालकर, काळे, सहकार पॅनल चे उमेदवार, मतदार उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!