देऊळ संस्कृतीचे वास्तव मांडणारी साहित्यकृती म्हणजे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे – सुषमा बेलकुंदे

देऊळ संस्कृतीचे वास्तव मांडणारी साहित्यकृती म्हणजे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे - सुषमा बेलकुंदे

उदगीर (एल.पी.उगीले) : देवळे अगोदर ज्ञानप्रसाराची व प्रबोधनाची केंद्रेआणि माहिती व संपर्काचे ठिकाण होते. उदरनिर्वाहासाठी सर्वांचं एक आशास्थान व तसेच सामूहिक संरक्षणाची जबाबदारी देखिल होती. देऊळ निर्मिती मागचा हेतू आणि आजची स्वार्थी धंदेवाईक पद्धती त्यातून होणारे शोषण त्यामुळे मूळ धर्म विचार बाजूला पडत असून लोककल्याणाचा मूळ हेतू संपत असल्याचे सांगत भिक्षुक शाहीवर कोरडे ओढत देऊळ संस्कृतीचे वास्तव मांडणारी साहित्यकृती म्हणजे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे होय असे विचार सुषमा बेलकुंदे हिने व्यक्त केले.

प्रतिभा काशिनाथ मुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या २७६ व्या विशेष बालवाचक संवाद मध्ये महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे बी.ए. तृतीय वर्गात शिकणारी कुमारी सुषमा मीना काशिनाथ बेलकुंदे या विद्यार्थिनीने प्रबोधनकार ठाकरे लिखित व गंगाधर बनबरे संपादित देवळांचा धर्म, धर्मांची देवळे या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाली की बहुजनांच्या पैशातून निर्माण झालेल्या देवळात बहुजनांच्या शिक्षण प्रबोधनाचा विषय बाजूला राहून दैववाद व गुलामीचा आलेख वाढत आहे. शिकलेली माणसे देखील अंधश्रद्धेपोटी मंदिरावर खर्च करत आहेत.देवस्थानाचे उत्पन्न शिक्षणासाठी खर्च झाले पाहिजे. नव पिढीला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी शिक्षणाची मंदिरे म्हणजे शाळा बांधल्या पाहिजेत याचा विचार करायला सांगणारी साहित्यकृती म्हणजे देवळांचा धर्म धर्मांची देवळे हीअसल्याचे विचार मांडले.

यावेळी झालेल्या चर्चेत धुमाळे तुकाराम व्यंकटराव. बिरादार आनंद नरसिंगराव. प्रदीप ढगे. उषाताई तोंडचीरकर ,अर्चना पैके आदींनी सहभाग घेतला. अनेकांनी देव आणि देऊळ या संदर्भाने आपापल्या मनातील शंका उपस्थित केल्या तर त्यांचे निरसन सुषमा बेलकुंदे हिने आपल्या शैलीतून केले. हा विशेष बालवाचक संवाद असल्याने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली. या वेळी कुमारी अवनी मनीषा वीरभद्र स्वामी या चिमुकलीने स्वागत गीत सादर केले. संवादकांचा परिचय कुमारी कांबळे अश्विनी हिने करून दिला. संचलन कु.अंकिता जयमाला प्रदीप ढगे हिने तर आभार कु. दिपाली हनुमंत म्हेत्रे हिने मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!