आजार कोणताही असो अंगावर काढू नका – डॉ. शरद कुमार तेलगाणे

आजार कोणताही असो अंगावर काढू नका - डॉ. शरद कुमार तेलगाणे

उदगीर (एल. पी. उगिले) : सध्या वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला, ताप अशा पद्धतीचे आजार जाणवायला लागतात. पावसाळ्यात ठिक ठिकाणी डबक्यात पाणी साचल्याने साथीचे आजार सुरु होतात. काही ठिकाणी डास उत्पत्ती होऊन इतरही आजार होऊ शकतात. केवळ ताप आहे, फक्त सर्दी आहे, अंगदुखी आहे. म्हणून स्वतःच्या मर्जीप्रमाणे घरात असलेली औषधे किंवा औषध विक्रेत्याकडून औषध घेऊन वेळ निभावून नेऊ नका. असा सल्ला ओम हॉस्पिटलचे तज्ञ डॉ. शरदकुमार तेलगाणे यांनी दिला आहे. सध्याची परिस्थिती वेगळी आहे. वेगवेगळ्या गंभीर स्वरूपातील आजार होऊ लागलेली आहेत. अशा परिस्थितीत वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार घ्यावेत, अन्यथा उशीर झाल्यास निदान हायला वेळ लागल्यामुळे जास्त त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डबक्यात साचलेल्या पाण्यात डास होऊन डेंग्यूसदृश आजाराची ही काही ठिकाणी लक्षणे आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच भांड्यात, घराच्या आजूबाजूला, छतावर, वेगवेगळ्या टाकाऊ वस्तु मध्येही पाणी साचून त्यामध्येही डासांची उत्पत्ती होत असते. आणि त्यापासून साथीचे रोग समाजामध्ये पसरू शकतात. सध्या ग्रामीण भागात काही ठिकाणी डेंगू सदृश्य आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसत असून नाल्या, गटार तुंबलेले आहेत, नाल्या गटारातील घाण रस्त्यावरच टाकली आहे. अशा ठिकाणी दुर्गंधी सोबतच डास निर्माण होऊन मलेरिया सारखे रोग वाढू लागले आहेत. त्यासाठी एका बाजूला नागरिकांनी स्वच्छता पाळावी, त्यासोबतच आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा ही योग्य वापर करावा. कोरोना विषाणूचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला असला तरी पूर्णपणे थांबलेला नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, महसूल प्रशासन आणि स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना त्याचेही पालन करावे. असेही आवाहन याप्रसंगी डॉक्टर शरदकुमार तेलगाणे यांनी केले आहे. शहरातील अनेक गल्लीबोळातून नाल्या तुंबलेल्या आहेत. पाणी साचल्यामुळे डास, मच्छर, किडे यांचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने धूर फवारणी सह गटारी स्वच्छ कराव्यात. अबॅटिंग करावी, त्यासोबतच डेंगू हा जीवघेणा आजार असल्याने त्याचा प्रसार होणार नाही. यासाठी दक्षता घ्यावी. असेही आवाहन डॉक्टर तेलगाणे यांनी केले आहे. या साथीच्या रोगा मध्ये लहान बालके आणि वृद्धांना जास्त जपावे. त्यांची प्रतिकारक्षमता वाढेल अशा पद्धतीचा आहार त्यांना द्यावा. भारतीय संस्कृती प्रमाणे राहण्याचा प्रयत्न करावा. असाही सल्ला दिला आहे. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक आणि सामाजिक जाणीव ठेवून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. आपला परिसर स्वच्छ ठेवावा. आपल्या आजूबाजूला लोकांमध्ये जनजागृती करावी. वेळोवेळी आपल्या परिसरातील स्वच्छतेच्या संदर्भात पालिका प्रशासन आणि आरोग्य केंद्राशी संपर्क साधून उपाययोजनांच्या संदर्भात सूचना कराव्यात. अशा काही महत्त्वाच्या बाबी याप्रसंगी डॉक्टर शरद तेलगाने यांनी सांगितल्या आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!