सायबर क्राईम जनजागृती काळाची गरज – पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे

सायबर क्राईम जनजागृती काळाची गरज - पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे

दयानंद कला महाविद्यालय सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम संपन्न!

लातूर (प्रतिनिधी) : विज्ञानाची व तंत्रज्ञानाची प्रगती होत असतानाच सायबर क्राईम मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. मोबाईल व संगणक वापरत असताना ते जितके फायदेशीर आहेत तितकेच त्यातील धोके सुद्धा आहेत. या संदर्भातली जनजागृती ही सर्व नागरिकांत होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले. ते दयानंद कला महाविद्यालयात आयोजित आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड हे होते. ते म्हणाले की,” दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या स्वरुपात बदल होताना दिसतो आहे. घरफोडी,पाकीटमार करणे अशा किरकोळ चोरांपासून आज ऑनलाइनच्या माध्यमातून अकाउंट हॅक करणे, एटीएमच्या माध्यमातून चोरी करणे अशी गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करणे गरजेचे आहे.

याप्रसंगी सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक अशोक बेले यांनीही जनजागृतीपर मार्गदर्शन केले. तसेच सुरज गायकवाड यांनी पावर पॉइंट प्रझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर क्राईमच्या संदर्भातील सविस्तर माहिती दिली. हॅकिंग, फिशिंग,चाईल्ड पॉर्नोग्राफी,ई शेअर मार्केट, पासवर्ड सिक्युरिटी याची माहिती त्यांनी सांगून यातून कशा पद्धतीची सायबर गुन्हेगारी वाढते हे त्यांनी सविस्तर सांगितले. एवढेच नव्हे तर यासाठी कुठली कलमे लागू होतात याबाबत ही जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी केले तर कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा जिगाजी बुद्रुके यांनी केले. याप्रसंगी सायबर क्राईमचे प्रदीप स्वामी व संतोष देवडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अकरावी ते एम.ए.चे अनेक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्यक,प्रा. सचिन पतंगे, प्रा. इरफान शेख व प्रीतम मुळे यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा संजय कुलकर्णी,प्रा. दयानंद शिरुरे,प्रा. अंजली बनसोडे, डॉ गोपाल बाहेती आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!