मुलींना दिलेल्या मेंदी प्रशिक्षणामुळे मुलींचे चांगले सक्षमीकरण होऊ शकेल – सौंदर्य तज्ञ अंजली वांगे

मुलींना दिलेल्या मेंदी प्रशिक्षणामुळे मुलींचे चांगले सक्षमीकरण होऊ शकेल - सौंदर्य तज्ञ अंजली वांगे

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समिती तर्फे आयोजित ‘बेसिक ते ब्रायडल ‘ या मेहंदी कार्यशाळेचा समारोप सौंदर्य तज्ञ अंजली वांगे यांच्या हस्ते करण्यात आला. या समारोप प्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे सन्माननीय सदस्य सागर मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना श्री सागर मंत्री यांनी महिला तक्रार निवारण समिती आणि मेहंदी प्रशिक्षक प्रिया कदम यांचे कौतुक केले. महिला तक्रार निवारण समितीने विद्यार्थिनी सक्षमीकरणाचे अत्यंत चांगले उदाहरण घालून दिले आहे असे सांगून त्यांनी दयानंद कला महाविद्यालय हे संस्थेच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे कार्य उत्तम करत असल्याचे मत मांडले. कोणत्याही चांगल्या कामासाठी दयानंद शिक्षण संस्था ही आपल्या मागे उभी असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अंजली वांगे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींना प्रयत्न आणि चिकाटी कोणत्याही कलेचे आवश्यक अंग असल्याचे सांगून या मेहंदी प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुली खूप चांगल्या पद्धतीने सक्षम होउ शकतात असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष डॉ.अंजली जोशी यांनी मांडताना हे प्रशिक्षण मुलींना देण्यामागचे प्रयोजन स्पष्ट केले. कला महाविद्यालयाच्या बहुतांश मुली या करियर कडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यांच्याकडे आर्थिक स्वावलंबनासाठीची कोणतीही डिग्री नसते. अशावेळी मेहंदी सारखे कौशल्य त्यांना शिकवल्यास त्या स्वतः आर्थिक सक्षम होऊ शकतात. नववधू ची मेहंदी काढण्याच्या ऑर्डर्स घेण्या साठी ही या मुलींना मार्गदर्शन केले गेले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांनी मुलींना मेहंदी प्रशिक्षणाचा फायदा सरकारी नोकरीपेक्षा अधिक असल्याचे सांगून स्वबळावर उभे राहण्याची मानसिकता आणि आत्मविश्वास या प्रशिक्षणातून दिला गेला असे मत व्यक्त केले. याप्रसंगी सहभागी मुलींनी आपले अनुभव सांगताना आत्मविश्वास आणि जगण्याचे साधन प्राप्त झाल्याचे मत मांडले. एक महिन्याच्या या कार्यशाळेसाठी 39 मुलींनी सहभाग नोंदवला होता. त्यांना प्रिया कदम या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने मेहंदी प्रशिक्षण दिले. या प्रसंगी एक मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. त्यातून मुलींना बक्षिसे व सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुवर्णा लवंद यांनी केले. तर आभार प्रा.दुर्गा शर्मा यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.अंजली बनसोडे तसेच अश्विनी सुरवसे,नवनाथ भालेराव,विकास खोगरें यांनी परिश्रम घेतले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!