अतिवृष्टी व गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांच मोठ नुकसान; शेतकर्यांना तात्काळ मदत करा

अतिवृष्टी व गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांच मोठ नुकसान; शेतकर्यांना तात्काळ मदत करा

आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हयात उशीराने पाऊस पडला होता. यामुळे पेरणीलाही उशीर झाला. यानंतर पावसाने मोठया प्रमाणात हजेरी लावली होती. जिल्हयातील बहुतांश भागात तर अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे पेरणी झालेली पिके वाहुन गेली आहेत. तसेच सतत पडणा-या पावसामुळे खरीप पिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. त्यानंतर गोगलगाय, पैसा या सारख्या किडीचा आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झालेला आहे. यामुळे पेरणी झालेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. सदर नुकसान ८० टक्केपेक्षा अधिक असल्याचे कृषि विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. काही भागात तर अतिवृष्टी झाल्यामुळे पिके वाहुन गेलेली असुन काही शेतांमध्ये अजुनही मोठया प्रमाणात पाणी साचलेले पाहण्यास मिळत आहे. सदर परिस्थिती उद्भवल्याने खरीपाचा हंगाम हातातून जाण्याची दाट शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर महसूल व कृषि विभागाने पंचनामे केलेले आहेत. या पंचनाम्याच्या माध्यमातून शेतक-यांच्या पदरात आता खरीपाचे पिक पडणार नाही, असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ( NDRF) व राज्य आपत्ती निवारण निधी (SDRF) च्या अंतर्गत शेतक-यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. NDRF च्या माध्यमातून केंद्र सरकारने तर SDRF च्या अंतर्गत राज्य सरकारने शेतक-यांना मदत करणे गरजेचे आहे. सदर मदत दोन टप्यात देण्यात यावी, जेणेकरून शेतकरी पुन्हा एकदा रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी आर्थिकदृष्टया सक्षम ठरेल.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!