स्त्री सन्मान शिवरायांचे नीतिशास्त्र – डॉ.गणेश बेळंबे

स्त्री सन्मान शिवरायांचे नीतिशास्त्र - डॉ.गणेश बेळंबे

उदगीर(एल.पी.उगीले) : छत्रपती शिवराय महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. तो देशाचा आत्मसन्मान आहे. शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करून आपल्या जनतेला न्याय, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुत्व प्रदान केले. असे करणारे ते जगातील एकमेव राजे आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये स्वातंत्र्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करून रोवली. हे वास्तव सत्य कोणालाही नाकरता येत नाही. शिवरायांनी शत्रूच्या स्त्रीला सुद्धा अत्यंत सन्मानाने वागवले. तिच्या अब्रूची सुरक्षा केली. तिचा आदर केला. तिला मानसन्मान दिला. शिवरायांनी आपल्या सैनिकांना सुद्धा सक्त ताकीद होती की, कोणत्याही स्त्रीशी गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. स्त्रीचा सदैव सन्मान करा. असा स्वराज्याचा दंडक होता. पण आज शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये स्त्री सुरक्षित नाही, अगणित अत्याचार होत आहेत. शिवराय समजून घेणे म्हणजे स्त्रीचा सन्मान करणे.अशावेळी शिवरायांच्या स्त्री सन्मान नीतीशास्त्राची प्रकर्षाने गरज जाणवते. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी जे केले देवालाही जमले नाही. छत्रपती शिवरायांच्या नीतीशास्त्राने स्त्री अत्याचार दूर करून स्त्री शक्तीचा सन्मान केला. त्यांच्या कर्तुत्वाला उंची देणारे ते जगातील जिजाऊ पुत्र महान राजे आहेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. गणेश बेळंबे यांनी उदगीर येथील सार्वजनिक शिवजयंतीच्या महोत्सवी व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी, प्रमुख पाहुणे म्हणून विराज पाटील शिरोळकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव नागरवाड,पर्यवेक्षक व्ही. एम बांगे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही अजने, कार्यालय प्रमुख डी.पी सूर्यवंशी, चंद्रकांत जाधव, दीपक चिखले, रमेश गोविंदवार,आर.एन जाधव, भाऊसाहेब कल्लूरकर,गणेश बारहत्ते,बंडू पाटील लोणीकर, परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील,वनमाला उखळकर, ज्योती सगर, संगीता यसलवाड, शुभांगी बिरादार,अनिता पाटील, सुनंदा मुर्कीकर यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एस जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन धोंडूबाई जाधव ,आभार सोनाली पाटील यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमल किशोर राजूरकर, माधव जाधव, बिरादार भगवान,कला शिक्षक एन.आर जवळे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!