स्त्रीत्वाला आत्मविश्वासाचा झोका देणारे नाटक म्हणजे “उंच माझा झोका गं!” – राम भुरे

स्त्रीत्वाला आत्मविश्वासाचा झोका देणारे नाटक म्हणजे "उंच माझा झोका गं!" - राम भुरे

उदगीर (एल.पी.उगीले) : समाज सुखी, आनंदी राहण्यासाठी सामाजिक तोल सांभाळणे गरजेचे असते. समाजातील आदर्श आणि महानता यांची जाणीव करून देण्यासाठी नाटके प्रभावी माध्यम आहेत. परंतु नाटकात सुख मांडताना भाबडेपणा व दुःख मांडताना श्रोत्यांच्या मनावर जखमा होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. काळजाला हात घालणारे संवाद लेखन करत असताना सामाजिक जाणीवा जपत मनोरंजनातून प्रबोधन करणारे, संवेदनशील स्त्री जीवनातल्या वर्तमान काळात जगण्यासाठी आत्मविश्वासाचा झोका देणारे नाटक म्हणजे “उंच माझा झोका गं!” हे होय. असे मत राम भुरे यांनी व्यक्त केले. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वाचक संवादाच्या २८४ व्या पुष्पात साहित्यिक तथा नाटककार राम भुरे यांनी अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे लिखित उंच माझा झोका गं! या साहित्यकृतीवर संवाद साधताना कांही पात्राचे उत्तम सादरीकरण करून दाखवत पुढे म्हणाले की, स्त्रियांना जगण्याचे बळ देणाऱ्या उंच माझा झोका गं! या नाटकाबरोबरच इतर चार एकांकिकाही या पुस्तकात आहेत. ‘चिंगी’ मध्ये आजोबा आणि नातीच्या आंतरिक जिव्हाळ्याची कथा असून, ‘साबरीत’ पालकांनी आपल्या महत्त्वकांक्षा पाल्यावर लादुन केला जाणारा अन्याय, अत्याचार दाखवला गेला आहे. तर ‘वात्सल्य’ मध्ये देवळात माणसाच्या श्रद्धेचा लिलाव करून स्वतःची खळगी भरणारी माणसं दाखवली गेली आहे. याबरोबरच ‘उरूस’ या एकांकिकेत बळीराजा कधी निसर्ग तर कधी राजकीय, सामाजिक व्यवस्थेमुळे कसा हतबल होतो, याचे चित्र केले गेलेले आहे. हे सांगतानाच स्त्री जीवनाच्या सहनशीलतेचे हेलकावे, आयुष्याची आयुध सांभाळताना हौसेचा प्रवास करणे अवघड असते. नवं करण्याची जिद्द, नवा विचार, नवे विषय, नवी मांडणी या बरोबरच प्रेक्षकांची नाळ या साहित्यकृतीमध्ये जोडली गेल्याचे जाणवते.असेही स्पष्टीकरण केले.

यावेळी झालेल्या चर्चेत प्रसिद्ध नाटककार तुळशीदास बिरादार म्हणाले की, मी जो नाही तो दाखवणे म्हणजे नाटक होय. शेवटी अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब पाटील म्हणाले की, वर्तमान काळात स्त्रियांना आत्मविश्वासाने जगण्याचा झोका देणारे संवाद या नाटकात आहेत. तर ते प्रभावीपणे मांडण्याचे काम राम भुरे यांनी केले आहे. अत्यंत प्रभावी ठरलेल्या या कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र एकंबेकर यांनी केले तर आभार आदित्य जाधव यांनी मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!