रेमडीसिवीर शिवाय कोरोणा बाधित रुग्णावर यशस्वी उपचार..!

रेमडीसिवीर शिवाय कोरोणा बाधित रुग्णावर यशस्वी उपचार..!

ना रेमडीसीवीर,ना महागडी औषधे तरीही रुग्ण होताहेत ठणठणीत बरे

अहमदपूर ( गोविंद काळे) : अहमदपूर येथील कदम हॉस्पिटल व कोव्हीड सेंटरच्यावतीने कोरणाबाधित रुग्णावर रेमडीसीवीरशिवाय ८५ वर्षीय अनुसया सुकरे व ७० वर्षीय सविता वाघमारे यांच्यावर स्कोर अनुक्रमे १३ व १४ उपचार करण्यात आला. सुखरूपपणे ते आपल्या घरी गेले. रेमडीसीवीरशिवाय असे एकूण २८ रुग्ण ठणठणीत बरे झाले एकही रुग्ण दगावला नाही.

याविषयी सविस्तर वृत असे की, कमीत कमी औषधांचा वापर करून ऑक्सिजन कमी पडत असल्यास ऑक्सिजन थेरपीचा वापर करतो .कधी कधी सुरुवातीला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स वापरतो हे पण सहज उपलब्ध आहे याशिवाय स्वस्त देखील आहेत. सुरुवातीला स्टेरॉइड्स दिल्यानंतर आम्ही ब्रांको डायलेटचा वापर करतो. अँटिव्हायरस औषधे सर्रास उपलब्ध आहेत त्यांचाही वापर करतो. यानंतरचे उपचार रुग्णांमध्ये दिसणाऱ्या लक्षणावर अवलंबून असतात कोणाला डोकेदुखी तर कोणाला जुलाब रुग्णाच्या लक्षणानुसार मग प्रत्येकाला उपचार दिले जातात अशा शब्दात डॉ. पी. एस. कदम यांनी रेमेडीसीवीरशिवाय रुग्णांना कोरोनामुक्त कसं करता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कोरोना रुग्णांचा तालुक्यात दिवसेंदिवस आकडा वाढत आहे. रुग्ण अत्यवस्थ होत आहेत . सध्या रेमडीसी वरची प्रचंड चर्चा आहे. मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे काळाबाजार होऊ लागला आहे. रेमडीसीवीरशिवाय उपचार शक्य नसल्याचं म्हणत काही रुग्णालय रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडीसीवीर आणण्यास सांगत आहेत तर काही ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक रेमडीसीवीर देण्याचा डॉक्टरांकडे आग्रह करत आहेत या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने डॉक्टरांशी संवाद साधला व रेमडीसीवीरशिवायही को रोणा रुग्णांना बरं करता येते याबद्दल उपचार पद्धती जाणून घेतली कदम हॉस्पिटल व कोव्हीड सेंटर , अहमदपूर येथे डॉ.पी. एस. कदम व त्यांच्यासोबत ची आयसीयूमध्ये काम करनारी त्यांची टीम डॉ. वैभव रेड्डी, डॉ. बालाजी साळुंखे , डॉ.आनंद शहापूरकर, डॉ.संग्राम नरवटे यांच्यामुळे रुग्णांना कोरणामुक्त करण्यात यश येत आहे. कदम हॉस्पिटल यांचा कर्मचारी वर्ग धनंजय भोसले, सूर्यकांत घोरपडे, संगम शिवपुजे, गुरुनाथ कदम, धोंडीराम हांडे ,दत्तात्रय पेड, क्रांती आडे ,लॅबटेक्निशियन मदन डोरे , गोरख नवले, फार्मासिस्ट धनंजय कोटलवार रुग्णांना बरे करण्यात स्टाफ कर्मचाऱ्यांचे सुद्धा मोठे योगदान आहे.

चौकट : आय. सी. एम.आरच्या गाईडलाइन्सनुसार गंभीर अवस्था असलेल्या पाच टक्के रुग्णांसाठी रेम डीसीवीर वापरण्यात यावा पण एम्स च्या नव्या गाईडलाईन नुसार रेमडी सीवीर वापरण्याची सक्ती नाही. कोरोनाचा परिणाम फुफसावर होतो व फुफसावर सूज येते व ऑक्सिजन कमी पडते या दोन गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्टेरॉइड्समुळे फुफसाची सूज कमी करता येते.
-डॉ.पी. एस. कदम
कदम हॉस्पिटल,अहमदपूर.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!