माणसाची सामाजिक जबाबदारी… ! गृहविलगीकरणाचे कटाक्षाने पालन करावे – डॉ.जयप्रकाश केंद्रे

माणसाची सामाजिक जबाबदारी... ! गृहविलगीकरणाचे कटाक्षाने पालन करावे - डॉ.जयप्रकाश केंद्रे

अहमदपूर ( गोविंद काळे ) : होम आयसोलेशन अर्थात गृह विलगीकरण हा शब्द आता सर्वांच्या चांगलाच परिचयाचा झालेला आहे.करोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय सूचवला जातो.गृह विलगीकरणात असताना करोना रुग्णाने योग्य ती काळजी घेतल्यास करोनामुळे रुग्णाच्या प्रकृतीत पुढे होणारी संभाव्य गुंतागुंत टाळता येऊ शकते.तसेच गृहविलगीकरणाचे योग्य तऱ्हेने पालन केल्याने करोनाचा प्रसार थांबवता येऊ शकतो. दुर्दैवाने असे निदर्शनास येते की गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी विलगीकरणाला पुरेसे गांभीर्याने न घेतल्यामुळे ते स्वतःसाठी घातक ठरू शकणाऱ्या आरोग्यविषयक गुंतागुंती ओढवून तर घेतातच त्याबरोबरच हे रुग्ण करोनाचे सुपर स्प्रेडर असल्यामुळे जाणते अजाणतेपणी करोनाच्या फैलावास कारणीभूत ठरतात. गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी स्वत:ची काळजी कशाप्रकारे घ्यावी आणि करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे समजून घेणे आवश्यक आहे.
स्वतःच्या प्रकृतीतील संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी तसेच आपल्यामार्फत होणारा करोनाचा प्रसार रोखण्यासाठी गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी पुढील काळजी घ्यावी.
गृहविलगीकरणात असताना रुग्णाने रक्तातील ऑक्सिजनची पातळी दर सहा तासांनी तपासावी.रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९५% पेक्षा कमी आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

विलगीकरणाच्या काळात फुफ्फुसांचे आरोग्य तपासण्यासाठी दररोज ६ मिनीटे वॉक टेस्ट करावी. ताप कमी होत नसेल किंवा अधूनमधून ताप येत असेल तसेच तीव्र स्वरुपाचा थकवा,डोकेदुखी जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
करोना आजार बरा होण्यात आहाराची भूमिका खूप महत्त्वाची आहे.अंडी,चिकन सूप, उडीद दाळ,पनीर,सोया वडी इ.प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करावा.तसेच दुध, फळे, फळांचा रस,भाज्या, सुकामेवा इ.पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा.
करोना रुग्णाच्या शरिरातील पाण्याचे प्रमाण सामान्य राखणे महत्त्वाचे असते. डिहायड्रेशन टाळण्यासाठी रुग्णाने भरपूर पाणी प्यावे. सौम्य स्वरूपाचे श्वसनसंबंधी व्यायाम उदा.दीर्घ श्वसन,प्राणायाम अवश्य करावे.

करोना आजारातून बरे होण्यासाठी आराम हा अत्यंत आवश्यक घटक आहे.त्यामुळे गृहविलगीकरणाच्या काळात रुग्णाने कोणत्याही प्रकारचे शारिरीक व मानसिक श्रम टाळावेत.
गृहविलगीकरणाच्या काळात चालू असलेली औषधे नियमीतपणे घ्यावीत. काही नवीन त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.मनाने औषधे घेणे टाळावे. गृहविलगीकरणाच्या काळात रूग्णाने शारिरीक स्वास्थ्याबरोबरच मानसिक आरोग्य सांभाळणे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे.या काळात नकारात्मक बातम्या ऐकू नयेत.नेहमी सकारात्मक विचार करावा, आशावादी असावे.ध्यानधारणा, संगीत ऐकणे,वाचन इ. मार्गांनी मन प्रसन्न आणि स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. रोग प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे अत्यंत गरजेचे असते.
तंबाखू खाणे, धुम्रपान करणे टाळावे. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार,एडस् इ.आजार असणाऱ्या करोना रुग्णांनी तसेच वयाने ज्येष्ठ करोना रुग्णांनी गृहविलगीकरणात राहणे टाळावे. गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी रोगाची लक्षणे दुरूस्त झाल्यानंतर सुद्धा चौदा दिवस पर्यंत गृहविलगीकरणाचे कटाक्षाने पालन करावे कारण रोगाची लक्षणे दिसत नसतील तरीही त्या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींना रुग्णापासून रोगाची लागण होऊ शकते.
सर्वात शेवटी एक बाब महत्त्वाची की लवकर निदान, योग्य उपचार, सकारात्मक विचार या माध्यमातून आरोग्यविषयक फारशी गुंतागुंत निर्माण न होता करोनावर मात करता येते.शिवाय करोनाच्या प्रसाराला आळा घालणे ही प्रत्येक माणसाची सामाजिक जबाबदारी आहे त्यासाठी सुद्धा गृहविलगीकरणाचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे.
– डॉ.जयप्रकाश केंद्रे, शासकीय ग्रामीण रुग्णालय , अहमदपूर.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!