लातूर जिल्हा

लावणीला जागतिक दर्जा मिळावा म्हणून सृष्टी जगताप यांचे कार्य कौतुकास्पद – राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राला कला व संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे हा सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी शासन नेहमी...

दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते साखर पोते पूजन व उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा शुभारंभ

5 लाख 55 हजार 911 चालू गळीत हंगामात उत्पादीत साखर पोत्यांचा शुभारंभ रेणापूर (प्रतिनिधी) : शेतकरी सभासदांच्या हिताला प्राधान्य देत...

अर्थसंकल्प नव्हे आगामी निवडणुकीचा जाहिरनामा

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची प्रतिक्रीया मुंबई (प्रतिनिधी) : संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प नसून...

विकास व विश्वासपात्र अर्थसंकल्प आहे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : देशातील कृषी,शिक्षण,आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला,युवक व वृद्ध या सर्वांना दिलासा देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री सौ.सीतारामन यांनी सध्याच्या कोरोना...

बोकनगावच्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलतर्फे माजी आ.शिवाजीराव पाटीलकव्हेकरांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोकनगाव येथील ग्रामपंचायतीअंतर्गत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मधुकर एकनाथ पाटील,...

अजित पाटील कव्हेकरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : मांडेज क्‍लासेसच्यावतीने इयत्ता 10 वी सी.बी.एस.सी. बोर्ड परिक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार जेएसपीएमचे कार्यकारी संचालक तथा भाजपा युवा मोर्च्याचे...

९७ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर: सरपंचपदी दिसणार नवीन चेहरे

अहमदपूर तालुक्यात ४८ ग्राम पंचायतवर महिलाराज अनेकांना धक्का तर काहींना लॉटरी अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या...

महात्मा गांधीजींचे विचार आचरणात आणण्याची गरज- डॉ.संतोष पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : " महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतून सामाजिक चळवळीला प्रारंभ केला. तिथेच त्यांना वंशभेद आणि वर्णभेदाची जाणीव झाली....

व्यक्तिमत्व विकासासाठी भाषिक संवाद कौशल्य आवश्यक – डॉ. पांडुरंग शितोळे

अहमदपूर (गोविंद काळे) : " भाषा हे मानवाच्या विकासाचे प्रमुख साधन असून, प्रत्यक्ष व्यवहारात यशस्वी होण्यासाठी भाषेचा अभ्यास खूप महत्त्वाचा...

सिंदगी खुर्द येथे वर्धिनी आम सभेचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सिंदगी खुर्द येथे दि 29 जाने रोजी वर्धिनी आम सभेचे आयोजन करण्यात आले होते या...

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!