रब्बी पीकपेरा नोंदणी ई-पीक पाहणी व्दारे करावी ; महसूल विभागाचे आवाहन

अतनूर (एल.पी.उगीले) : ई-पीक पाहणी अंतर्गत रब्बी हंगाम २०२२-२०२३ साठी पीकपेरा नोंदणीची सुरूवात झाली आहे. मोबाईलच्या माध्यमातून पेरा नोंदणीसाठी सुधारित व्हर्जनचे अॕप तयार केले असून शेतकऱ्यांनी रब्बी पीकपेरा नोंदणी करावी, असे आवाहन महसूल विभागाचे अतनूर सज्जाचे तलाठी अतीक शेख, महसूल चे नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यात १५ आँगस्ट २०२१ पासून महाराष्ट्र शासनाचा ई-पीक पाहणी प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अंतर्गत खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करून या प्रकल्पास प्रतिसाद दिला होता. याप्रमाणेच रब्बी हंगाम २०२२-२०२३ मध्ये ई-पीक पाहणी मोबाईल अॕपव्दारे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे.

अतनूर सज्जा अंतर्गत अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, मरसांगवी व शिवाजीनगर तांडा येथील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे कि, रब्बी पीकपेरा नोंदणी ई-पीक पाहणी यात गहु, हरभरा, करडाई, राजमा, रब्बी, ज्वारी, मका, तीळ, सूर्यफुल आदी पिकांचा पेरा नोंदविता येणार आहे. या सुधारित अॕपमध्ये शेतकऱ्यांच्या प्रत्येक गटाच्या मध्यबिंदुचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे.

पेरा नोंदणीसाठी पिकाचा फोटो घेताना ते फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदुपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पेरा नोंदणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल अॕपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकांचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही. हे लक्षात येईल. यामुळे पेरा नोंदविण्यासाठी आता त्या क्षेत्रातच जाऊन पेरा नोंदवावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदलेला पेरा स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन, त्याची गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंद होणार आहे. शेतकऱ्यांनी रब्बीतील सर्वच पिकांचा पेरा ई-पीक पाहणी अंतर्गत नोंद करावी. असे आवाहन महसूल विभागाकडून तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, अतनूर सज्जाचे तलाठी अतीक शेख, कृषी विभागाकडून अतनूरचे कृषी सहाय्यक संदीप पाटील, शेतकरी गटाच्या वतीने कुणबी शेतकरी समूह गटाचे अध्यक्ष शेतकरी बी.जी.शिंदे यांनी केले आहे.

हरभरा विक्रीसाठी पेरा नोंदणी गरजेची आहे.
शेतकऱ्यांनी किमान हमी दरानुसार हरभरा शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी विर्कीपूर्व नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी त्या शेतकऱ्याच्या सातबारा वर पीकपेऱ्याची नोंद आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन पीकपेरा नोंदणी करणे गरजेचे आहे.असे तलाठी अतीक शेख, कृषीसहाय्यक संदीप पाटील, कुणबी शेतकरी गटाचे अध्यक्ष बी.जी.शिंदे यांनी सांगितले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!