सोशल मिडीया हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – प्रा. बालाजी कारामुंगीकर

सोशल मिडीया हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम - प्रा. बालाजी कारामुंगीकर

अहमदपूर (गोविंद काळे) : सोशल मिडियाचा मालक आपण स्वतः असल्याने त्याच्या वापर विधायक व परिवर्तनासाठी केला पाहिजे सोशल मिडीया हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन प्रा. बालाजी कारामुंगीकर केले.
ते प्रबोधन शिबीर 2021 या ग्रुपवर आज दि. 9 मे 2021 रोजी दु. 2.00 वाजता गुगल मिटवर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी लसाकमचे संस्थापक नरसिंग घोडके, प्रदेश अध्यक्ष बालाजी थोटवे, प्रदेश महासचिव राजकुमार नामवाड, प्रदेश प्रवक्‍ता डॉ. मारोती कसाब, शिरीष दिवेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर दुवे यासह कार्यकारणीतील सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. कारामुंगीकर म्हणाले की, सोशल मिडीया हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून ते समाज जीवनाच्या सर्व अंगात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. मातंग समाजातील तरूणांनी याचा पुरेपुर वापर करून घ्यावा. समाज परिवर्तनाच्या चळवळीनी यांचा वापर ग्रामीण जीवनाशी जोडल्यास विकास होईल. शैक्षणिक , सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात यांचा विधायक वापर करता येतो. सध्याच्या काळात राजकीय सत्ता उलटून टाकणे आणि निवडणूक जिंकणे यामध्ये सोशल मिडीयाचा वापर निर्णायक ठरते आहे. सोशल मिडीया व मुख्य प्रवाहीतील मिडीया ( डेलळरश्र चशवळर रपव ारळप ीीींशरा ाशवळर ) यामधील फरक स्पष्ट करताना एश्रशलीीेंपळल रपव िीळपीं ाशवळर च्या मालकानूसार वापर होतो. परंतु सोशल मिडीयाचा मालक आपण स्वतः असल्याने त्याचा वापर विधायक व परिवर्तनासाठी केले पाहिजे. सामाजिक माध्यमांचे हजारो ऍप्स आज घडिला उपलब्ध आहेत. यातील बहुतेक सर्वच एप्सचा वापर विनामुल्य करता येवू शकतो. आपले विचार, भावना, आपल्यातील कला लोकांपर्यंत पोहचविण्याचे एक प्रभावशाली माध्यम म्हणुन सामाजिक माध्यकांचा वापर संपुर्ण जगभरात आज होतो आहे.
मातंग समाजातील तरुणांना मला आवर्जुन सांगावेसे वाटते कि सामाजिक माध्यम म्हणजे आपणास भेटलेले एक प्रभावी हत्यार आहे. असं हत्यार त्याचा योग्य प्रकारे उपयोग करुन आपण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शेक्षणिक क्षेत्रात प्रगती करु शकतो आणि या सामाजिक माध्यमांचा योग्य प्रकारे वापर करु शकतो. महापुरुषांचा विचारांना जिवंत ठेवुन सद्य परिस्थितीची जाण करुन देण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या विविध माध्यमांचा उपयोग केला जावू शकतो. गुगल मिट, झुम ऍप सारख्या माध्यमांचा वापर करुन डायरेक्ट मिटिंग घेवून समाजातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला जावू शकतो. महापुरुषांचे विचार, त्यांचे पीडीएफ रुपातील ग्रंथ, गुगलवर उपलब्ध विविध प्रकारची माहिती आपण समाजापर्यंत पोहचू शकतो. सामाजाचे वास्तव चित्र जगापुढे आपण ठेवू शकतो. समाजाला दिशा देण्याचे कार्य सामाजिक माध्यमांच्या उपयोगाने तरुणांनी करावे असेही ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी थोटवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हिंगोलीचे आत्माराम गायकवाड यानी मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!