विज वितरणाच्या चुकिच्या धोरणामुळे शेतकरी त्रस्त – बसवराजप्पा मठपती

शिरुर अनंतपाळ (प्रतिनिधी) : तालुक्यात शेतकऱ्यांना विजवीतरण कडून वीज पुरवठा 24 तासातून 8 तास केला जातो परंतु रात्र पाळी ची लाईट शेतकऱ्यांना 11 च्या नंतर पुरवठा केला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांना रात्री बेरात्री जाऊन पाणी चालू करणे जिकारीचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज पुरवठा कधीही खंडित होतो कधीही सुरु होतो.यामुळे शेतात मोटार चालु करण्यासाठी जाणे म्हणजे जीवावर बेतल्यासारखे आहे त्यामुळे वीज वितरण ने 8 तासच लाईट द्यावी तेही दिवसा रात्रीची पाळी या दिवसात तरी बंद करावी अशी मागणी जेष्ठ कृषी तज्ञ बसवराज नागनाथप्पा मठपती यांनी केली आहे

About The Author

error: Content is protected !!