वृक्षारोपण ही कृषीविश्वातील चळवळ बनावी – प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी

0
वृक्षारोपण ही कृषीविश्वातील चळवळ बनावी - प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी

वृक्षारोपण ही कृषीविश्वातील चळवळ बनावी - प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी

उदगीर (एल. पी. उगिले) : वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. कृषी विश्वात काम करणाऱ्या सर्वांनीच त्याचे गांभीर्य विचारात घेणे गरजेचे आहे. विशेषतः कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड ही एक चळवळ म्हणून काम करणे गरजेचे आहे. असे विचार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासी संलग्न असलेल्या उदगीर तालुक्यातील कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथील प्राचार्य डॉक्टर ए.पी. सूर्यवंशी यांनी जागतिक पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
याप्रसंगी “आपली जमीन, आपले भविष्य” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यवंशी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जमीन व झाडे यांचा शेतकरी आणि कृषी खात्याशी संबंधित सर्व घटकांचा जिव्हाळ्याचा संबंध असल्याचे विशद केले. राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे स्वयंसेवक वृक्ष लागवड करतातच परंतु केवळ औपचारिकता म्हणून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन न होता ती एक लोक चळवळ बनणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून सर्वांनाच वृक्षारोपणाची गोडी निर्माण होईल अशा पद्धतीचे संस्कार त्यांच्यावर देणे गरजेचे आहे. वृक्षसंपदा ही सजीवांना मिळालेली अनन्य साधारण अशी मोठी देणगी आहे. त्यामुळे पृथ्वीतलावर वृक्षांच्या संख्येत वाढ होणे, वृक्ष संवर्धन करण्याची विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे गरजेचे आहे. असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे रामचंद्र खंडागळे यांनी देखील पर्यावरणाचे बिघडलेले असंतुलन बदलून निसर्गचक्र पूर्ववत सुरू ठेवायचे असेल तर वृक्षा शिवाय पर्याय नाही. सद्यस्थितीत कोरडवाहू शेतीला जो फटका अवकाळी पाऊस आणि पावसाळ्यामध्ये पावसाची उघडीप होणे यामुळे होत आहे. त्यासोबतच ग्लोबल वार्मिंग मुळे पुढील पिढीचे होणारे नुकसान टाळायचे असेल तर शाश्वत विकासाचा विचार करून वृक्षारोपण करावे, असे सांगितले.
याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आनंद दापकेकर यांनी देखील मानवी जीवन आणि वृक्षारोपण हे कसे एकमेकावर अवलंबून आहेत, हे सांगताना पर्यावरणाचा असमतोल मानवी हव्यासापोटी होत आहे, मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड थांबली पाहिजे. आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वृक्षारोपण करावे, असे सांगितले.
या प्रसंगी कृषी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे संचालक गंगाधररावजी दापकेकर, स्वयंसेवक म्हणून काम करणारे अल्ताफ शेख, सुरज लंगोटे, समर्थ जगताप, अर्जुन खिल्लारे, राज डिसले, गायत्री गावंडे, मुक्ता वाडीवाले, अनुराधा लोंढे इत्यादी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन खंडागळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!